प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनाही चिमटे काढले. “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असा चिमटा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काढला.
“भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सत्तास्थापनेसाठी भाजपला जोडीदार हवा आहे, त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी ही मिश्किल टीका केली.
यावेळी त्यांनी शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, 1 तारखेपासून सर्व व्यवहार सुरु करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी जनतेला केलं. ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरी अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.