रायगड : देशावरील कोरोनाचं संकट अजून टळलं नसताना मंदिरे खुली करून संकटाला आमंत्रण देण्याची वेळ येऊ शकते. मात्र, राज्यातील भाजप नेते हे मंदिरे खुली करण्याचा पवित्रा घेत राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे योग्य नाही अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर केली आहे. आगामी काळात जिल्ह्यात सकारात्मक भूमिका घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही प्रमाणात कमी होत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाने हळूहळू टाळेबंदी शिथिल करीत असून व्यवहार सुरू झाले आहेत. अशावेळी भाजपकडून राजकारण केले जात आहे. मंदिरे उघडण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे आंदोलने केली जात आहेत.
मात्र कोरोना महामारी ही अद्यापही नष्ट झालेली नाही असे असताना मंदिरे उघडून संकटाला आमंत्रण देण्याबाबत भाजपचा आग्रही आहे. त्यामुळे अशा संकट काळात भाजपने राजकारण न करता संयमी भूमिका घेणे गरजेचे आहे अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. अलिबाग शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना भाजपचे सुरू असलेले राजकारण, आगामी निवडणुका बाबत धोरण, आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शेकाप आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडी सोबत आहेत का आणि आपली मैत्री अद्याप आहे का यावर तटकरे यांनी, शेकाप हा महाविकास आघाडी सोबत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
Read Also :
मुंबई बाहेर देखील उर्वरित महाराष्ट्र आहे… माजी मंत्री निलंगेकर यांचा CM ठाकरेंना टोला https://t.co/Du6aY3NbEr#Smbhajipatilnilangekar #CMThackarey @sambhajipatil77
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020