मुंबई – राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाही आणि ते असण्याचे कारणही नाही. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत,’ असे वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली
विजय वडेट्टीवार यांच्या एटीकेचा आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महविकासआघाडीचा उल्लेख तिघाडी असा केला आहे. “हे भारी आहे तिघाडीचे… कमरेचं सोडू नि डोक्याला गुंडाळू पण भाजपची जिरवू…” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अतुल भातखळकर यांचे ट्विट –
‘जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही तिघे एकत्र!’… वडेट्टीवार हे भारी आहे तिघाडीचे… कमरेचं सोडू नि डोक्याला गुंडाळू पण भाजपची जिरवू…