मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला. परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
हजारो विद्यार्थ्यांचे
मुख्यमंत्र्यांच्या
पावला वर पाऊल…
'घरी बसून' अंतिम वर्षाची परीक्षा देणार…युवराजाच्या हट्टामुळे सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ… pic.twitter.com/SQP5fLYUNG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 5, 2020
अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत भातखळकर म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे यापूर्वी कुलगुरूंच्या बाबतीत खोटे बोलले व आता आता कुलगुरूंनाच अनभिज्ञ ठेवले आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणात ठाकरे सरकार कडून ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्याचे काम केले जात आहे.
घरबसल्या परीक्षा देण्याची मुभा देण्यात आल्याच्या शिफारसीचा निर्णयच झाला नसल्याची बाब समोर आली असून, कुलगुरूंना देण्यात आलेल्या पत्रांमध्ये सुद्धा घरबसल्या परीक्षा देण्याचा उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एकंदरीतच उच्च शिक्षणाचा पूर्ण बट्ट्याबोळ करण्याचा उद्योग युवराजांच्या हट्टापायीच चालू आहे. या संदर्भात आपण कुलपती म्हणून राज्यपालांकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बाबतीत तक्रार केली आहे, असेही भातखळकर म्हणाले.