मुंबई : काल रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात व ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले, उपनगरी रेल्वेसेवांवरही परिणाम झाला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई महापालिकेने या पावसातही पुन्हा मुंबई तुंबवून दाखवली. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच ही वेळ आली आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
नालेसफाईत टक्केवारी, कोविड सेंटर मध्ये टक्केवारी, खुद्द महापौरांवर आरोप, अशा प्रकारे भ्रष्टाचाराने लडबडलेल्या महापालिकेच्या कारभारामुळेच सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर घालणारी ही परिस्थिती उद्भवली आहे, असे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली.
पण तरीही ते 'घरी'च.
दार उघड भावा दार उघड…@OfficeofUT @mybmc pic.twitter.com/CrX66hauRZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 23, 2020