मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून, दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये, आरोग्य यंत्रणांच्या तांत्रिक अडचणींमुळे, एकूण ३८ करोना बाधित रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक मधली घटना ताजी असतानाच, आज विरारमधील, विजय वल्लभ रुग्णालयातील, कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागामध्ये, एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली, या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी, एका पत्रकाराला उत्तर देताना, “विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे.” असं विधान केलं. यावरून भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना, आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे.
“किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा. त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी दुःख तरी व्यक्त करा. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो,” अशा शब्दांत भातळकर ट्विट करत टोपे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे!अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. @rajeshtope11 तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो. https://t.co/X7DSPX8Y5z
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 23, 2021
देशात एकीकडे करोना साथीने आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांनी रुग्णांचे मृत्यू होत असताना, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून, दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये, आरोग्य यंत्रणांच्या तांत्रिक अडचणींमुळे, एकूण ३८ करोना बाधित रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.