मुंबई : केंद्राच्या तुलनेत राज्य शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्याने स्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये स्थिती अतिशय गंभीर असल्याचे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
यांच्या आंदोलनाचे जेव्हापासून मोदींनी नर्मदेत विसर्जन केलंय तेव्हापासून बाई मोदींद्वेषाने पछाडलेल्या असतात, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी मेधा पाटकर यांच्यावर केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ऑक्सिजनची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसत आहे. यात केंद्र शासन अपयशी ठरले अशी टीका मेधा पाटकर यांनी केली होती. तसेच, गुजरात, यूपीमधील स्थिती भयंकर असल्याचे म्हटले होते. यावरून भातखळकर यांनी टीका केली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, यांच्या आंदोलनाचे जेव्हापासून मोदींनी नर्मदेत विसर्जन केलंय तेव्हापासून बाई मोदींद्वेषाने इतक्या पछाडलेल्या असतात की त्यांना महाराष्ट्रात आलबेल आणि दिल्लीही कोरोना मुक्त वाटू शकेल, असा सणसणीत टोला लगावला.