मुंबई – शिवसेनेसोबत आता जाणार नाही. शिवसेनेबद्दल कटूता नाही. मात्र आम्हाला राष्ट्रवादीही नको आणि शिवसेनाही नको. आता आम्हाला आमची ताकद पाहायची आहे. आमचं संघटन मजबूत झालं आहे, हे माझं मत आहे. तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तो केंद्रीय नेतृत्व घेईल, असं विधान करत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते, प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धव ठाकरेंना या प्रश्नांचा अभ्यास नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे हे ही माहित नव्हतं. कामकाज कसं होतं हे माहित नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं त्यांचं कौशल्य खरोखर मोठं आहे. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. मात्र शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतही चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
Read Also –
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का? – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय