राज्यात परतीच्या पावसाने बसलेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरचा दौरा करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना त्यांनी फडणवीसांरखा दौरा करुन उपयोग नाही असं म्हटलं आहे.
“मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधील काही गावांचा दौरा केला. असा धावता प्रवास करुन काही होणार नाही. खूप ठिकाणी जाऊन लोकांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री व्हायचं असतं कारण जे वाटतं ते तिथल्या तिथे निर्णय जाहीर करुन प्रशासनाकडून त्यांची अमलबजावणी करता आली पाहिजे. काल नाही, पण किमान आज काहीतरी मदत जाहीर करायला हवी होती जेणेकरुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “बाकीच्यांनी प्रवासच करायचा असतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास करायचा, अश्रू पुसायचे, तुमच्या मागण्या मांडतो असं सांगायचं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासारखा प्रवास करुन काही उपयोग नाही. त्या प्रवासात काही ठोस घोषणा केल्या पाहिजेत. पुन्हा अतिवृष्टी होईल, पाहतो असं बोलायचं नसतं,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Read also :
‘राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं’ https://t.co/lpvq3RN9Je @Prksh_Ambedkar @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020