मुंबई – राज्यात कोरोना लसींचा साठा हा मुबलक आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उदभवण्यासाठी हे राज्यातील ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नाही असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला. कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होऊ नये. परंतु, ठाकरे सरकार हे केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट कारस्थान करून काम करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली. (pravin darekar slams thackeray govt over coronavirus situation)
प्रवीण दरेकर यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होत असल्याचा दावा करत आहे. 30 लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले असल्याचे राज सरकारकडून सांगितले जात आहे. मग या लसी तुम्हाला केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का? असा सवाल प्रविण दरेकर यांनी विचारला आहे.
तसेच ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत केंद्रा सरकारकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान प्रविण दरेकर यांनी दिले.
Read Also :
- सामनातल्या “त्या” लेखाचा, अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांकडून जाहीर निषेध; मुख्यमंत्र्यांना पत्रातून दिला “हा” इशारा
- ‘खट्याळ मुल देखील थयथयाट करून शांत होतात, याचा इतका थयथयाट कशासाठी?’
- ‘…त्यामुळेच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे’
- संजय राऊत यांनी आतातरी अपरिपक्वतेतून लिखाण थांबवावे, संजय काकडेंची तिखट टीका
- दैनिक सामनामधून ममता बॅनर्जी यांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांशी तुलना