‘दार उघड उद्धवा दार उघड’… अशा प्रकारची आरोळी देत शनिवारी साईबाबांच्या शिर्डीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं. सरकारनं जर आमची मागणी मान्य केली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर घंटानाद करण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. राज्यात अनलॉक होत असताना दारू दुकानं खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद ? असा खोचक सवाल देखील विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.
राज्यातील धार्मिक स्थळे खुली करावी, ही मागणी करत शनिवारी राज्यभर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपनं घंटानाद आंदोलन करण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचे व्यावसायिक आणी गावकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
..तर आम्ही स्वत: मंदिर उघडू – खासदार सुजय विखे पाटील
शिर्डी मात्र जोवर साईमंदिर सुरू होत नाही तोवर कोणताही व्यवसाय सुरू होवू शकत नाही. आजही शिर्डी पूर्णणे बंद असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. सरकारने लवकर मंदिर सुरू करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही परवानगी नसताना मंदिर सुरू करू, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला आहे
Read Also This
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘दार उघड उद्धवा दार उघड’ ! मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाचे घंटानाद आंदोलनhttps://t.co/unT8YLmFPe@maheshklandge @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @bjpforpcmc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 29, 2020