सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला क्वारंटाईन केले होते . यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चाहल यांनी गटनेत्यांच्या बैठकीला हजर राहण्यास नकार दिल्याने आयुक्त आणि गटनेत्यांमधील वाद समोर आला आहे. यावर भातखळकर म्हणाले, “मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांपुढे नेते हतबल… इकडे आयुक्त गटनेत्यांना जुमानत नाहीत आणि तिकडे महापौर सीबीआय अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करायला निघाल्या आहेत”, अशी टीका त्यांनी ट्विटर द्वारे केली आहे.
सुशांतच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार वरून पोलीस अधिकारी मुंबई दाखल झाले होते. मात्र त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती. यावर आज पुन्हा एकदा भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.