मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडण्यास मनाई आहे. सरकारकडून साध्या पद्धतीने ईद साजरे करण्याचे आवाहन करम्यात आले असले तरीही लोकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंब्र्यात ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका करत असून, सरकार वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगळा न्याय करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली.
मुंब्र्यात ईदची तोबा गर्दी आहे, कारण हे बोटचेपे ठाकरे सरकार फक्त हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवू शकते…
कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत? pic.twitter.com/7fUec3UGVW— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 13, 2021
मुंब्र्यात ईदची तोबा गर्दी आहे, कारण हे बोटचेपे ठाकरे सरकार फक्त हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवू शकते. कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत?, अशी टीका भातखळकर यांनी आव्हाडांवर केली आहेत.
याच मुंब्र्यात लसीकरणाला विरोध झाला, पहिल्या लाटेच्या वेळी आयसोलेशन सेंटरमध्ये जायला विरोध झाला, आता याच मुंब्र्यात रमजानच्या नावाखाली लोक फिरत आहेत. डब्ल्यूएचओचे सल्लागार असलेलेल्या आपल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांच्या राज्यात वेगवेगळ्या धर्मांना वेगळे न्याय आहेत, असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
कुंभ मेळ्यावर ट्विट करणारे जितेंद्र आव्हाड कुठे आहेत ? ते गप्प का आहेत, याचे उत्तर मंत्री व तेथील आमदार म्हणून त्यांनी द्यावे. केवळ मतांच्या लालसेमुळे राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला.