विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार अशा अफवा पसरवल्या जात असताना आता याला महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे,आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणूकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत.परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही.मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून वारंवार काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचे विधान विरोधात असलेल्या भाजपकडून केलं जातंय. त्याला आता नवाब मलिक यांनी जोरदार प्रतीउत्तर देत भाजपला धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही अफवा विरोधक पसरवत असून ही चर्चा खोटी आणि बिनबुडाची आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,
उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020