राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे..जनतेने नाकारलेलं असताना तीन पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा,’ असे वक्तव्य करत भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सरकारवर टीका केली आहे तसेच केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले होते.यावेळी ते बोलत होते. ‘राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करणं चुकीचं असून जर केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला?’ असा सवाल त्यांनी सरकारला यावेळी विचारला.
संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्यावरहि त्यांनी निशाणा साधला आहे . ते म्हणाले, संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा अपमान केला असून त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही विखेंनी यावेळी केली . जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही…? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.