मुंबई : प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या हिंसक घटनेत भाजपच्या एका नेत्याचा हात असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत ही शंका व्यक्त केली आहे.
‘लाल किल्ल्यावर जे काही घडले त्यात पीएमओच्या अगदी जवळील भाजप नेत्याचा हात आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे’, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे. भाजप खासदार सनी देओल याचा लोकसभेतील मुख्य प्रचारक दीप सिद्धू याच्यावर शेतकऱ्यांना भडकवल्याचा आरोप होत आहे. दीप सिद्धूचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो देखील व्हायरल होत आहे. त्याबाबतची एक बातमी देखील स्वामी यांनी रिट्विट केली आहे.याआधी काही शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू याच्यावर शेतकऱ्यांना चिथवण्याचा आणि हिंसा घडवून आणण्याचा आरोप केला आहे. यानंतर दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकल्याचा आरोपही झाल आहे.