मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघ़डे ठेवले असून शिंदे साहेबांच्यावतीने प्रवक्ते व आमदारांनी चर्चा करावी. तसेच ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपवर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडल्याने त्यात भाजपने मोठ्यामनाने मध्यस्ती करावी, असं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षामध्ये दिपाली सय्यद ह्या नेहमी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीची होणार बैठक; पवारांनी सांगितला फार्म्युला
राज्याच्या सत्ता संघर्षात शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था सध्या गोंधळाची झाली आहे. यातच दिपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून भाजपवर निशाणा साधत आहेत. काल त्या म्हणाल्या की, शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का? उद्धव साहेबां विरोधात चिरीट तोम्मया बोलणार आणि तुम्ही ऐकुन घेणार हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे? पहिले चिरीटला तुमच्या पंक्तीतुन बाहेर काढा नंतर शिवसैनिक नाव लावा.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या तर..; नाना पटोलेंनी दिला सरकारला इशारा
शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे. असंही त्या म्हणाल्या होत्या.
“असंगाशी केला संग अन् सत्तेचे स्वप्न झाले भंग”; सदाभाऊंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
दरम्यान, बंडखोरी ही प्रत्येकामध्ये असते आणि ती माणसाला जिवंत ठेवते. बंडखोर असणे महत्वाचा आहे. पहिलं बंड ज्ञानेश्वरांनी केलं होतं. शरद पवारांनी 38 वर्षात 38 आमदार पाडले. बंडखोर कोण नाही विधानसभा अध्यक्ष देखील बंडखोर आहेत. त्यामुळे बंडखोरांचा सन्मान देशात नव्हे तर जगात देखील केलं जात आहे. तसेच बंडखोरीनंतर चांगली पदं भेटली पाहिजे असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Read also
- “एकनाथ खडसेंची सध्याची अवस्था म्हणजे मंदिरात गेले अन् चप्पल चोरीला गेली”
- “दिल्ली दौर्याचा राजकीय अजेंडा नाही, खातेवाटपांवर चर्चा झाली नाही”; देवेंद्र फडणवीस
- “अडीच वर्ष सरकार टिकणार, अन् पुढील ५ वर्षही आम्ही सत्तेत राहणार”
- “राऊतांनी आता थांबावं, नाहीतर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेच सेनेत उरणार”
- “ज्यांनी 50 खोके घेतले, त्यांना लवकरच जुलाब होतील”; राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा