मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे देशाच्या राजकारणात मध्यबिंदु ठरले आहेत. या बंडखोरीची जवळपास २६ देशांनी दखल घेतली आहे. तर महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वोत मोठा बंड असल्याचा इतिहास देखील झाला आहे. आता याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; निवडणुकांच्या तारखा जाहीर
लहरी राजा, दरबार अंधातरी मग झाली. दरबारातील हुजऱ्यांची माजोरी तर राजा काय करी, अशा लहरी कारभाराविरूद्ध केलेला तो उठाव होता. या उठावाला कधीही गद्दारी म्हटलं जात नाही. ह्याला इतिहास साक्षी आहे. मागील काळात एन. टी. रामाराव ह्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी देखील अशाच प्रकारे उठाव केला होता. तसेच आत्ताच्या घडीला इंग्लंडमधल्या खासदारांनी केलेला उठाव असो. या सर्व उठावांना गद्दारी कसं म्हणता येऊ शकत? उठाव हे सुद्धा शस्त्र आहे आणि राजकारणातील जुनं शास्त्र आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“दहावीला दोनदा नापास झालेला अन् मुख्यमंत्र्यांवर टिका करतोय”; राणेंचा राऊतांवर निशाणा
‘मध्यावधी निवडणूक व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की, असंगाशी केला संग अन् सत्तेचे स्वप्न झाले भंग. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या अभद्र युतीचं असंच काहीसं झालं. शिवसेनेने भाजप बरोबर युती करून विधानसभेची निवडणूक लढवली आणि जनतेने ह्या युतीला भरभरून मते दिली. परंतु त्यानंतर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर गळ्यात गळा घातला आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. खरं पाहिलं तर तुम्ही त्याच वेळी सर्वांचे राजीनामे घेऊन फेर निवडणूक लढवली असती तर आज त्या गोष्टीचा आदर्श घेतला गेला असता. असा टोला देखील त्यांनी दिली.
“उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
दरम्यान, शिवसेनेने अडीच वर्षात काय केले, त्यांनी बेरोजगारीचा, महागाईचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, व्यवसायकांचा कोणताही प्रश्न त्यांना सोडावला नाही. उद्धव ठाकरे हे कोणत्याही आमदार, खासदार आणि सेनेच्या नेत्यांना भेटले नाहीत , त्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत. फक्त मातोश्रीतच बसायचं. यामुळे सरकार पडले असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- राष्ट्रवादीत ‘नॉट ऑल वेल’, कार्यकारिणी बैठकीत ज्येष्ठांची ‘दांडी’
- “शिवसेना संपली, पुन्हा ती कधीही उठणार नाही;” नारायण राणेंचं सुचकं वक्तव्य
- ” नियतीचा खेळ! मनसेला हिणवणारे आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाला”
- “ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका घ्याव्यात;” पंकजा मुंडेंची मागणी, शिंदे सरकारची भुमिका काय?
- ‘त्या’ फाईलवर मीच सही केली होती; भुजबळांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा किस्सा