मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना घेऊन भाजप सोबत युतीचे सरकार स्थापन केले. सत्ता स्थापनेनंतरही भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांवर शिवसेनेच्या नेत्यांकडुन आरोप केले जात आहेत. यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना संपली असुन आता शिवसेना पुन्हा उठणार नाही. असा टोला त्यांनी लगावत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
“उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
शिवसेनेने अडीच वर्षात काय केले, त्यांनी बेरोजगारीचा, महागाईचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, व्यवसायकांचा कोणताही प्रश्न त्यांना सोडावला नाही. उद्धव ठाकरे हे कोणत्याही आमदार, खासदार आणि सेनेच्या नेत्यांना भेटले नाहीत , त्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत. फक्त मातोश्रीतच बसायचं. यामुळे सरकार पडले असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
कल्याण डोबिंवलीतील 55 नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर; ठाकरेंना अजून एक मोठा धक्का
महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे यांच्या घराला नोटीसा देणे आणि फक्त भ्रष्टाचार करण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असंही मी म्हणलो होतो आणि तसंच झालं आहे. खरं तर हे सरकार पडण्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत जबाबदार आहेत. सरकारला शुभेच्छा न देता सरकार पडणार अशा पद्धतीची वक्तव्ये करणे हे शरद पवार यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. राज्यातील सरकार वारंवार पडणे, राज्याच्या हिताचे नाही. यामुळे राज्याचा विकासही होत नाही. असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला.
बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरे मैदानात: ‘मिशन 236’ अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत होती. नारायण राणे शिवसेनेच्या तसेच महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्यांवर टिकास्त्र सोडत होते. अशातच आता राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आल्याने नारायण राणे इतर नेत्यांवर टिका टिप्पणी करणार का ? तो देखील प्रश्न उपस्थित होत असून कालच भाजप नेते किरीट सोमय्यांवर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी शिवसेनेवर टिका न करण्याचा इशारा दिला आहे.
Read also
- ” नियतीचा खेळ! मनसेला हिणवणारे आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाला”
- “ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका घ्याव्यात;” पंकजा मुंडेंची मागणी, शिंदे सरकारची भुमिका काय?
- ‘त्या’ फाईलवर मीच सही केली होती; भुजबळांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा किस्सा
- नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; निवडणुकांच्या तारखा जाहीर
- “दहावीला दोनदा नापास झालेला अन् मुख्यमंत्र्यांवर टिका करतोय”; राणेंचा राऊतांवर निशाणा