मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकांचा देखील धुरळा उडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आता राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नव्या सरकारला ओबीसी आरक्षणाबाबत इशारा दिला आहे.
बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरे मैदानात: ‘मिशन 236’ अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपने ओबीसी आरक्षणावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता भाजप यावर काय भुमिका घेणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.?
“कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा”; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सुचना
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी सरकार ने अचुक इम्पिरीकल डेटा न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तसेच महाविकास आघाडीकडून ओबीसी आरक्षणाची हत्या करण्यात आली आहे, अशा प्रकारची टिका भाजपने मविआवर केली होती. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. त्याकडे सर्वाॆंचे लक्ष्य लागून राहिलं आहे.
ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
दरम्यान, या निवडणुकांसाठी उमेदवारांना 22ते 28 जुलै रोजी अर्ज उपलब्ध होणार असून त्याच अवधीत अर्ज स्विकारलं जाणार आहेत. तर 29 जुलै रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली असून 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक लागणार आहे. तर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read also
- ‘त्या’ फाईलवर मीच सही केली होती; भुजबळांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा किस्सा
- नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; निवडणुकांच्या तारखा जाहीर
- “दहावीला दोनदा नापास झालेला अन् मुख्यमंत्र्यांवर टिका करतोय”; राणेंचा राऊतांवर निशाणा
- “उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
- कल्याण डोबिंवलीतील 55 नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर; ठाकरेंना अजून एक मोठा धक्का