मुंबई : शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात होतो. शिवसेनेचे पहिले शाखा प्रमुख तसेच त्यात मुंबईतले 10 ते 15 शाखाप्रमुख होतो. त्यानंतर मुंबईचा महापौर आणि त्यानंतर आमदार झालो. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांना हे माहिती असेल. या सगळ्या गोष्टी घडून 20 ते 25 वर्ष झाली आहेत. नवीन शिवसैनिकांना आणि आमदारांना या गोष्टी माहिती असण्याची शक्यता नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलं आहे.
“कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा”; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सुचना
बेळगावातील आंदोलनाला गेलेल्या दुसऱ्या गटाचं नेतृत्व केलं होतं. कन्नड पोलीस आता येऊ देणार नाहीत अटक करणार हे माहिती होतं. त्या दिवशी वेषांतर करून गेलो होतो. त्यावेळी मला मार बसला, दोन महिन्यांपासून सुटलो आंदोलन करत शिवसेना वाढवण्याचं काम केलं. शिवसेना भाजपचा पहिला समझोता झाला त्यावेळी दोन तीन लोकं होतो त्यात देखील असल्याचा उल्लेख छगन भुजबळ यांनी केला आहे.
ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
मंडल आयोगाच्या मुद्दावरून बाळासाहेब ठाकरे आणि माझे मतभेद झाले. यातून आम्ही 17 जण बाहेर पडलो. आमच्या 18 पैकी 6 जण माघारी गेले. 12 जण काॅंग्रेसमध्ये गेलो. 1999 मध्ये आमचं सरकार आल्यानंतर शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत 1992 ते 93 च्या दंगली प्रकरणी श्रीकृष्ण आयोगानं ज्यांना आरोपी म्हटलं होतं. त्यांना अटक करू अशी घोषणा केली होती. आमच्या पक्षाच्या घोषणेप्रमाणे त्या फाईलवर सही केली होती. बाळासाहेब ठाकरेंना अटक होणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावेळचे पोलीस अधिकारी एम. एन सिंग यांना बाळासाहेब ठाकरेंची पोलीस कोठडी मागायची नाही असं सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या जामीनाला विरोध करायचा नाही. न्यायालयाने कोठडी घेण्यास सांगितल्यास मातोश्रीला गृहमंत्र्यांच्या अधिकारात तुंरूगात जाहीर करायचं असं सांगितलं होतं. पण बाळासाहेब ठाकरे त्यामधून सुटले असंही छगन भुजबळ म्हणाले.
मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार
दरम्यान, बाळासाहेबाच्या शिवसेनेचं धनुष्यबान हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. गेल्या महिन्यात शिवसेनेत 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. यापाठोपाठ शिवसेनेला अजुन एक धक्का बसणार असल्याच समोर येत आहे. शिवसेनेच धनुष्यवान हे चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल 11 जुलैला लागणार आहे शिंदे गटाच्या बाजुने हा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
Read also
- नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; निवडणुकांच्या तारखा जाहीर
- “दहावीला दोनदा नापास झालेला अन् मुख्यमंत्र्यांवर टिका करतोय”; राणेंचा राऊतांवर निशाणा
- “उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
- कल्याण डोबिंवलीतील 55 नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर; ठाकरेंना अजून एक मोठा धक्का
- बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरे मैदानात: ‘मिशन 236’ अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार