मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेला मोठा हादरा बसला आहे. त्याचसोबत आता बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात पोहचल्याने त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेचं आजपासून आयोजन केलं आहे. ते जवळपास शिवसेनेच्या 236 शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे.
“काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला गळती सत्र सुरू झालं आहे. अनेक आमदारांसोबत नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळेच आदित्य ठाकरे आज शिवसेनेच्या 236 शाखांना भेटी देणार आहेत. सेनेच्या 236 शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांची आदित्य ठाकरे भेट घेऊन संवाद साधणार आहेत. सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जाणार आहे.
“मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेवर भाजप नेते नितेश राणे यांनी टिका केली आहे. स्वत:च सरकार असताना DINO वर निष्ठा दाखवण्यापेक्षा तीच निष्ठा जर शिवसैनिकांवर दाखवली असती तर निष्ठा यात्रा काढण्याची वेळ आली नसती. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. काल ठाण्यातील जवळपास 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर डोंबवलीतील 55 आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे.
“चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
दरम्यान, “कायद्याने जी लढाई लढायची आहे, ती लढुच. मात्र कायद्याची लढाईत अपयश आल्यास गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा आणि कमी वेळेत घरा घरात पोहचवा” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नैसर्गिक युतीला पाठिंबा द्यावा, असं बंडखोर आमदार शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची भाषा करू नये, असंही ते म्हणाले.
Read also
- “कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा”; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सुचना
- ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
- मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार
- “खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र
- काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार