मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरू आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये उपस्थित राहुन संवाद साधत आहेत. यातच आज परभणी येथील मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पाठिंबा दर्शविला आहे. त्यात पत्रात त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे.
भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
त्यांनी पत्रात असं म्हटलं आहे की, आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा घेतली पक्षप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा आगळावेगळा प्रवास केलात. जात, पात, धर्म, वर्ण, प्रांत आणि पक्ष यापलीकडे जाऊन मानवतावादाचे, समतेचे राजकारण, गोरगरीब जनतेच्या विकासाचे राजकारण हा नवीन पायंडा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत आपल्या नेतृत्वाने पडलात. कोरोना आणि लॉकडाऊन स्थितीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला आपण कुटूंब प्रमुख आहात हे भान दिलेत. अवघा महाराष्ट्र आपल्या सुचनेचे पालन करत असताना राज्यातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर अन्न मिळावे म्हणुन शिवभोजन थाळी सुरू करून भुकेल्या जनतेच्या मनात आणि त्यांना ऊर्जा निर्माण केलीत.
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
तसेच पुढे असं म्हटलं आहे की, खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला. महाराष्ट्र रडला महाराष्ट्रातील जनता म्हणाली पुन्हा ऐसा मुख्यमंत्री होणे नाही. सध्याची राजकीय परिस्थिती व त्यातुन निर्माण झालेल्या जनतेची व्दिधा मनस्थिती पाहता सध्या पक्षाची होत असलेली पडझड पाहता आम्ही सर्व आपल्या सोबत उभे आहोत. पुन्हा एकदा पक्ष आपल्या नेतृत्वात उभारी घेईल याची खात्री बाळगून संस्था आपल्या सोबत जोडून आहे व राहील हा विश्वास आपणास देत आहेत.
शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी
आई जगदंबा चरणी, आपल्याला उत्तम सदृढ आरोग्य लाभो, जिद्द व लढण्याची ताकद मिळो हीच प्राथना पक्ष संघटन मजबुतीसाठी उभारी घेऊ कारण आपल्यासारख्या संयमी, संवेदनशील, सुजाण, प्रामाणिक आणि कुशल राज्यकर्त्याची महाराष्ट्राला सदैव गरज राहील तसेच आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.
Read also
- काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार
- “काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
- “मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
- “चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
- “भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य