पुणे । विशेष प्रतिनिधी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची असलेली आघाडी तोडा, शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी आणि आमदारांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, अशी नाराजी उघडपणे बोलली जात होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ठाकरे सरकार कोसळले. तरीही पुणे जिल्ह्यात सन्मानाची अपेक्षा करणाऱ्या शिवसेना निष्ठावंताच्या पदरी उपेक्षाच पडताना दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे दुखावलेले ४० आमदार सत्तेतून बाहेर पडले. भाजपासोबत घरोबा करीत, शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांनी थेट शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा केला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली.
“भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागली असतना, संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. शिंदे गटाकडून काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सेनेची फरपट होत असल्याचा दावा केला. त्याला ५५ पैकी ४० आमदारांचे समर्थन मिळाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढराव पाटील यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. तशा आशयाची बातमीही ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली. आढळराव शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र ’ करणार, असे चित्र निर्माण झाले. मात्र, उद्धव ठाकरेंनी आढळरावांची समजूत काढली. वास्तविक, शिरुर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासूनच ‘बिघाडी’आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील संघर्ष सर्वज्ञात आहे. खेड पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना- राष्ट्रवादीत झालेला वाद राज्यात पोहोचला होता. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचे काम करीत आहे, असा आरोप राज्यात सर्वप्रथम कुणी केला असेल, तर तो आढळराव पाटील यांनी केला.
“माझ्यामुळेच शिंदेंना आमदारकी मिळाली, नाही तर त्यांनी आईवडिलांची शपथ घेऊन सांगावं”
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीसह पवार कुटुंबियांना थेट आव्हान देणारा आणि ताकदीचा नेता म्हणून आढळराव पाटलांची ओळख आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुमारे १८ वर्षे आढळरावांनी जिल्ह्यात शिवसेना वाढवली. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयोगात आढळराव यांना ताकद मिळाली नाही. याउलट, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले. सलग तीनवेळा शिरुरमधून खासदार राहीलेले आढळराव पाटील यांचा ग्रामीण भागात प्रचंड लोकसंपर्क आहे. कुसलीही शहानिशा न करता हकालपट्टीच्या कारवाई केली. पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. आढळराव मुंबईल उद्धव ठाकरे यांना भेटले. त्याठिकाणी काही ठोस विश्वास मिळणे अपेक्षीत होते. मात्र, आढळरावांना पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणुकीची तयारी करण्याची सूचना करण्यात आली. वास्तविक, आढळराव पाटील शिरुरमधून निवडून येण्याची क्षमता ठेवतात.
आता ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून; भाजपच्या वेगाने हालचाली सुरू
याउलट, जागा वाटपात काँग्रेसकडे असलेली जागा आढळरावांना दिल्यानंतर काँग्रेस आढळरावांचे काम करणार का? असा प्रश्न आहे. दुसरीकडे, शिरुरची जागा डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीला सोडणार हे आता निश्चित झाले आहे. हकालपट्टीच्या कारवाईनंतर शिवसेनेकडून आढळराव पाटलांना मतदार संघ सोडण्याच्या सूचना मिळाव्यात, ही सन्मानाची नव्हे, तर अपमानाची वागणूक आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. मध्यंतरी, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘शिव संवाद’ दौरा केला. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची कामे करीत नाहीत, असा आरोप केला होता. त्याचेही पडसाद राज्यभरात उमटले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत असूनही राष्ट्रवादीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही, हे बारणे यांनी जाहीरपणे सांगितले. आता बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली असली, तरी लोकसभा निवडणुकीत मावळ व शिरुरच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करणार आहे. त्यामुळे बारणे यांनासुद्धा अन्य मतदार संघ शोधण्याची हतबलता भोगावी लागणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
विजय शिवतारे यांचे राजकीय पानिपत…
शिवसेना- भाजपा सत्ताकाळात राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे सांगून पराभूत केले. शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कायम आगपाखड केली. त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. महाविकास आघाडी सत्तेच्या काळात शिवतारे यांचे पुनर्वसन करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी १२ मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी विचारांचे आमदार आहेत, तसेच ९ मतदार संघात भाजपाच्या विचारांचे आमदार आहेत. शिवसेना जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीत हद्दपार झाली. माजी आमदार, नेते, पदाधिकारी यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यताल शिवसेनेचे अपमानीत योद्धे आणखी किती काळ तग धरणार? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
Read also
- मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात
- “गरज वाटल्यास मी खर्च करतोय, पण त्यांच्यावर चांगला उपचार करा”; अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री
- “भाजप पदाधिकाऱ्यांचं कृत्य देशभरातील ओबीसी आरक्षणासाठी मारक”
- “आमच्यावर ही वेळ आली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?”राऊतांचा सवाल
- “गुलाबराव पाटील हे आयत्या बिळात बसून नागोबा झालेले मंत्री”; विनायक राऊतांचा टोला