मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसात मोठ्या राजकीय घटना घडून आल्या. याच घडामोडीत शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्री पदाचा कारभार संभाळणार आहेत. त्याआधी त्यांनी मंत्रालयात सत्यनारायणाची पुजा देखील करणार आहेत.
“माझ्यामुळेच शिंदेंना आमदारकी मिळाली, नाही तर त्यांनी आईवडिलांची शपथ घेऊन सांगावं”
आज मंत्रालयात सत्य नारायणाची पुजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा कारभार स्विकारणार आहेत. त्यामुळे मंत्रालयात आज फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमाही मुख्यमंत्री दालनात लावल्या आहेत. त्यामुळे सध्या कार्यकत्यांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळत असून अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
आता ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून; भाजपच्या वेगाने हालचाली सुरू
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच शिवसेना नेमकी कोणाची? खरे शिवसैनिक कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेता तसेच त्यानंतर नेतेपदावरून देखील हटवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे.
“सेनेचा आक्रमक नेता गावाकडे जाऊन करतोय शेती”; अधिवेशन संपल्यानंतर लगेच धरली गावाकडची वाट
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या 12 जुलै किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे सध्या 50 आमदार असून प्रत्येक 4 आमदारांमागे एक मंत्रीपद देण्याचा फार्म्युला ठरवण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून भाजपकडे 25 ते 27 मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महत्वाची खाती कुणाकडे जाणार? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “गरज वाटल्यास मी खर्च करतोय, पण त्यांच्यावर चांगला उपचार करा”; अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री
- “भाजप पदाधिकाऱ्यांचं कृत्य देशभरातील ओबीसी आरक्षणासाठी मारक”
- “आमच्यावर ही वेळ आली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?”राऊतांचा सवाल
- “गुलाबराव पाटील हे आयत्या बिळात बसून नागोबा झालेले मंत्री”; विनायक राऊतांचा टोला
- “भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या