मुंबई : मागील महिन्यात राज्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला आहे. विधानपरिषद निवडणुकीत कॉग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभुत झाले होते. कॉंग्रेसच्या उमेदवाराला 44 मतांपैकी त्याना 22 मते पडली होती. यामध्ये सात आमदारांनी क्रॉस मतदान केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कॉग्रेसच्या या सात आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीरीज चव्हाण यांनी केली होती.
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
महाराष्ट्रातील राजकारणातील सत्ता बदलानंतर काॅंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीतील हायकमांडची भेट घेतली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कॅग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात केलेले मतदान या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत गेल्या असल्याची चर्चा रंगली आहे. हायकमांडने दखल घ्यावी यासाठी त्यांनी मागणी केली होती, याची हायकमांडने नोंद घेतली आहे. अस नाना पटोले यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी
नाना पटोले आज राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचही सांगितले आहे. हायकमांडनेही या प्रकरणात लक्ष घातले आहे. या आमदारांवर लवकरच कारवाई होईल असेही त्यांनी सांगितले आहे. कॅग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्यांवर हायकमांडाच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे. आमदारांना कोड देण्यात आले होते कोणी मत दिले नाही हे आम्हाला माहित आहे असंही म्हटल आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. यामध्ये भाजपचे सहाही उमेदवार निवडून आले होते. तर काॅंग्रेसकडे संख्याबळ असून देखील त्यांचा एक उमेदवार पराभूत झाला होता.
Read also
- “काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
- “मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
- “चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
- “भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
- भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी