मुंबई : विधानसभेतील विशेष अधिवेशन संपल्यानंतर आता बहुतेक आमदारांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे. शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्करराव जाधव हे भात लावणी करताना दिसले. त्यांचे शेतात गावाकडची भिलारी गाणी म्हणत भात लावणी करतानाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर आता भाजपनेते नितेश राणे यांचे देखील शेतात भात लावणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
“आमच्यावर ही वेळ आली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?”राऊतांचा सवाल
कोकणातील गुहागार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव आहेत. त्यांची गावाकडे शेती असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड करतात. कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य आम्हाला वर्षभर पुरतं असं भास्करराव जाधव नेहमी आपुलकीने सांगतात. तसेच ते शेतामध्ये पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना हातभार लावतात.
“गुलाबराव पाटील हे आयत्या बिळात बसून नागोबा झालेले मंत्री”; विनायक राऊतांचा टोला
तर नितेश राणे यांनी देखील काल शेतात छोटा ट्रक्टर घेत भात लावणीसाठी चिखल केला. त्यानंतर त्यांनी शेताच्या बांधावर बसून न्याहारी देखील केली. नितेश राणे यांनी त्यांच्या मुळ गावी म्हणजे कणकवली येथील वरवडे येथे भातलावणी केली. तसेच बंडखोर आमदार संजय शिरसाठ देखील शेतात रमल्याचं दिसत आहे.
“भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या
दरम्यान, विधानसभेतील विशेष अधिवेशनातील त्यांचं भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं. तुमच्या वर्मावर घाव पडतोय म्हणून माझं बोलणं ऐकून घेतलं जात नाही. भाजपने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. तसेच तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात. मराठी माणसांवर इडी लावत आहोत. मग भाजपच्या नेत्यांवर का लावत नाही, असं सवालही त्यांनी केला होता.
Read also
- उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
- शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी
- मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात
- “गरज वाटल्यास मी खर्च करतोय, पण त्यांच्यावर चांगला उपचार करा”; अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री
- “भाजप पदाधिकाऱ्यांचं कृत्य देशभरातील ओबीसी आरक्षणासाठी मारक”