पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कारच्या अपघाताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. या घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाहीय. यावरूनच पुण्यात विविध घटना घडत आहेत. पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.
हेही वाचा..“सरकारी कामात अडथळा आणल्याने टिंगरेंवर गुन्हा दाखल करा”, वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी
पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाखाली येऊ नये. पण दबावतंत्र सत्तेत असलेली लोकचं देऊ शकतात. त्यामुळे देवेंद्रजी कुणाबद्दल बोलत होते, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यायला हवं. राजकीय दबाव कोण टाकतोय ? कोणी फोन केला ? कुणामुळे जामीन मिळाला ? या सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावे, असेही सुळेंनी म्हटलंय.
हेही वाचा…” निवडणुकी आधी बंडखोरी, नंतर स्नेहभोजन,” सांगलीत विशाल पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या आहेत, पण पुण्याचे पालकमंत्री कुठे ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय. यातच दरम्यान, माझी पालकमंत्र्यांची काही भेट झाली नाही. पम हा प्रश्न देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यावर त्यांना विचारायला हवा होता. असे उत्तर सुळेंनी अजित पवारांच्या गप्प बसलेल्या भूमिकेवर दिलं.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे अपघातावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढणार ?
हेही वाचा…“आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”
हेही वाचा..“पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करा,” धंगेकरांनी काही बाबी समोर आणत केली मोठी मागणी
हेही वाचा..“नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ?”, वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..“ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या नेत्यासाठी भाजपसोबत भिडला”, पहा नेमकं घडलं काय ?