पुणे : पुण्यातल्या अपघातानंतर आता विरोधकांनी तिघांना घेरलं आहे. यामध्ये पोलिस आयुक्त अमितेश कुमार , राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा समावेश आहे. कलम ३०३४ लावण्यावरून कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिशाभूल करण्याचा आरोप केलाय. तर भाजपनं हा आरोप फेटाळून लावला आहे. यातच ०४ दिवस होऊनही आरोपी वेदांत अग्रवालाचा ब्लड रिपोर्ट अजूनही कसा आला नाही. यावरून आयुक्तांवर प्रश्नांचा भडिमार सुरू आहे. तर घटना घडल्यानंतर आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलिस स्टेशनमध्ये का गेले होते. असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या वनीता देशमुख यांनी केलाय.
हेही वाचा…” निवडणुकी आधी बंडखोरी, नंतर स्नेहभोजन,” सांगलीत विशाल पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
अपघात झाल्यानंतर पुण्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार सुरू झाले आहे. याप्रकरणात सुनील टिंगरे यांच्यावर देखील पोलिसांवर दबाव टाकण्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या वनीता देशमुख यांनी टिंगरे यांच्यावर अग्रवालच्या बिल्डरला वाचवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंचं तापलंय.
हेही वाचा…“शांत बसण्यासाठी पोलिसांना पैशाची पाकिटं गेलीत ?”रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यातील अपघात राजकीय वर्तुळात आल्याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पोलिस आयुक्ताला भेट देत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तसेच अनधिकृत पब, बारवर देखील कारवाई करण्याचे सांगितले. यातच आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील याप्रकरणात हस्तक्षेप केलाय. ड्रॅंक अन्ड ड्राईव्ह केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य कायदेशीर निर्णय घ्यावा, असे आदेशच अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिलेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”
हेही वाचा..“पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करा,” धंगेकरांनी काही बाबी समोर आणत केली मोठी मागणी
हेही वाचा..“नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ?”, वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..“ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या नेत्यासाठी भाजपसोबत भिडला”, पहा नेमकं घडलं काय ?
हेही वाचा..“सरकारी कामात अडथळा आणल्याने टिंगरेंवर गुन्हा दाखल करा”, वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी