पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच या अपघाताबाबत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरणार असा इशारा कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेर यांनी सरकारला दिला आहे. यातच या प्रकरणात बिल्डरकडून पोलीस आयुक्त, पोलिस महासंचालक तसेच इतर पोलिसांना पैशाची पाकिटं देण्यात आली आहे. असा आरोप देखील धंगेकर यांनी केला आहे.
आरोपी वेदांत अग्रवालसह त्याचे वडलांना देखील पोलिसांनी कोठडी सुनावली आहे. मात्र सुरूवातीला गुन्हा दाखल झाला तेव्हा ३०४ कलमाएवजी फक्त ३०४ अ असा कलम लावण्यात आला होता. यातच रवींद्र धंगेकर यांनी एफआरआयची कॉपी देखील ट्विट केली होती. यातच फक्त पैशाच्या बळावर हा प्रकार सुरू झाला आहे. याच्यामध्ये डिलींग कुठे झाली ? काय झालं ? कोणी केलं. कुठल्या हॉटेलमध्ये झालं ? पोलिस महासंचालक, आयुक्त यांना पाकिटं कसे गेलीत ? या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केलीय.
हेही वाचा..“रोहित पवारांनी थेट व्हिडीओच आणले,” पंकजा मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
अपघात झाल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे. तो पोलीस आयुक्तांशिवाय होऊच शकत नाही. एवढा मोठा गंभीर अपघात झाला आहे. दोन लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांचे शव ससूनच्या रूग्णालयात असतानाच हा माणसाला घरी पाठवलं जातं. त्याचा बाप घरी जाऊन आराम करतो. ही कुठली नितीमत्ता आहे. असा सवाल देखील धंगेकर यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“तेव्हा तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस झोपला होता का ?” शरद पवार गटाचा फडणवीसांना खोचक सवाल
हेही वाचा…वायकर जिंकले काय अन् हरले काय ? माझा काय दोष ? गजानन किर्तीकरांच्या विधानाने खळबळ
हेही वाचा…बाथरूममध्ये पाय घसरून कॉंग्रेस आमदाराचा मृत्यू, कोल्हापुरात एकच खळबळ
हेही वाचा…‘नाईट लाईफ संस्कृतीच्या अशा प्रकाराला आळा घाला”, लहू बालवडकर यांची मोठी मागणी
हेही वाचा..ठाकरे अन् केजरीवाल यांच्या भाषणानंतर मुंबईचं वारं फिरलं