मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाचही टप्प्यात मतदान झालं असून आता निकालाची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे गजानन किर्तीकर यांची पक्षातून हाकालपट्टी करा, अशी मागणी देखील केली जात आहे.
हेही वाचा..“भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले”, दानवेंचा खळबळजनक आरोप
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय, यात माझा काय दोष ? मतदार जे ठरवतात, ते होईल. पण अमोल जिंकला तर मला नक्कीच आनंद होईल, असे विधान गजानन किर्तीकर यांनी केले आहे. गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होत असून, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी करणारे पत्र शिंदे सेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
हेही वाचा..“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला
शिशिर शिंदेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील किर्तीकर यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पत्रकारांनी प्रश्न केला. २० दिवस तुमचा पाठिंबा कोणाला ? रवींद्र वायकर यांच्या पुर्वतयारीसाठी जेवढ्या सभा झाल्या त्या सर्वांना मी उपस्थित होतो. कोल्हापुर आणि नाशिकमध्ये जाऊन प्रचारही केला. तरीही काही गोष्टींचा विपर्यास करण्यात आल्याचे गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याचा मला त्रास होत आहे. असा प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये. माझ्या पत्नीने सांगितली ती गोष्ट खरी आहे. तिने तिचे मत मांडले आहे. असेही किर्तीकर यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बाथरूममध्ये पाय घसरून कॉंग्रेस आमदाराचा मृत्यू, कोल्हापुरात एकच खळबळ
हेही वाचा…‘नाईट लाईफ संस्कृतीच्या अशा प्रकाराला आळा घाला”, लहू बालवडकर यांची मोठी मागणी
हेही वाचा..ठाकरे अन् केजरीवाल यांच्या भाषणानंतर मुंबईचं वारं फिरलं
हेही वाचा..“रोहित पवारांनी थेट व्हिडीओच आणले,” पंकजा मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…