पुणे : पुण्यात पहाटे झालेल्या कल्याणीनगर अपघातात दोन दुचाकी स्वरांचा भीषण मृत्यू झाला आहे. याप्रकरणानंतर आता पुण्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या संदर्भात पोलिसांनी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडिल विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. तर याप्रकरणात आता वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे टिकेची धनी बनले आहेत.
अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे रात्रीच पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्याकडून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा काही नेत्यांकडून आरोप केला जात आहे. तर सुनील टिंगरे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्यावर ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीने पोलिसांकडे तक्रार दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…वायकर जिंकले काय अन् हरले काय ? माझा काय दोष ? गजानन किर्तीकरांच्या विधानाने खळबळ
रात्री अपघात झाल्यानंतर माझ्या पीएचा तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन केले होते. की विशाल अग्रवाल यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. त्यामुळेच मी पोलीस ठाण्यात पोहचलो होतो. त्यानंतर पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्यास सांगतिलं होतं. मृतांच्या नातेवाईकांशी देखील त्यावेळी बोललो होते.असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावर वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला आहे तो दुर्दैवीच होता. परंतु त्यामागून जे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये पुण्याच्या काही नेत्यांची मला कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ? असा सवाल करत ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या आहेत. त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयीही लक्ष द्यावे, असं म्हणत वसंत मोरे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
हेही वाचा…बाथरूममध्ये पाय घसरून कॉंग्रेस आमदाराचा मृत्यू, कोल्हापुरात एकच खळबळ
सोबताच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडे लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदन दिलीत त्यांनी सुद्धा एनआयबी कोंढाव भागाकडे लक्ष द्यावे, नाहीतर असं म्हणावं लागेल की कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरूण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरूण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ? असा संतप्त सवालही त्यांनी केलाय.
यासह कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत. भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. असा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच पोलीस यंत्रणनेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपुर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट केले पाहिजे. अन्यथा वंचित बहुनज आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झालीतर त्याला संपुर्णपणे जबाबदार ही भ्रष्ठ यंत्रणा असेल असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या नेत्यासाठी भाजपसोबत भिडला”, पहा नेमकं घडलं काय ?
हेही वाचा..“सरकारी कामात अडथळा आणल्याने टिंगरेंवर गुन्हा दाखल करा”, वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी
हेही वाचा…” निवडणुकी आधी बंडखोरी, नंतर स्नेहभोजन,” सांगलीत विशाल पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…“शांत बसण्यासाठी पोलिसांना पैशाची पाकिटं गेलीत ?”रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
हेही वाचा..“तेव्हा तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस झोपला होता का ?” शरद पवार गटाचा फडणवीसांना खोचक सवाल