मुंबई : बाळासाहेबाच्या शिवसेनेचं धनुष्यबान हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. गेल्या महिन्यात शिवसेनेत 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. ठाण्यातील तब्बल 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. यातच आता डोंबिवलीतील नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार
काल एकनाथ शिंदे यांची कल्याण- डोंबिवलीमधील 55 नगरसेवकांनी भेट घेतली असून त्यांच्या भुमिकेला नगरसेवकांनी पाठिंबा दिला असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. त्यामुळे आता ठाणे, पुणे आणि सातारा येथील काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
“कायद्याने जी लढाई लढायची आहे, ती लढुच. मात्र कायद्याची लढाईत अपयश आल्यास गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा आणि कमी वेळेत घरा घरात पोहचवा” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नैसर्गिक युतीला पाठिंबा द्यावा, असं बंडखोर आमदार शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची भाषा करू नये, असंही ते म्हणाले.
“मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यास पक्षचिन्हांचा प्रश्न सुटतील असं वक्तव्य दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण या चिन्हावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्याचा निकाल येत्या ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
Read also
- बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरे मैदानात: ‘मिशन 236’ अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
- “कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा”; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सुचना
- ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
- मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार
- “खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र