पिंपरी । विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडी सत्तेत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झालेले नवचैतन्य अल्पावधीत मावळले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाचे नवे सरकार स्थापन झाले. तसे, राष्ट्रवादीतील अस्वस्थता वाढली असून, भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून राष्ट्रवादीतील अस्वस्थांना गळाला लावण्याची रणनिती आखली जात आहे. विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड भाजपाकडून आगामी महापालिका निवडणुकीत ‘१०० पार’च्या नारा पुन्हा उच्चारला. राज्यात भाजपा सत्तेत आल्यामुळे महापालिका निवडणूक सोपी होणार, असा विश्वास भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटू लागला आहे.
“दहावीला दोनदा नापास झालेला अन् मुख्यमंत्र्यांवर टिका करतोय”; राणेंचा राऊतांवर निशाणा
दरम्यान, भाजपाकडून ‘‘अब की बार १०० पार’’असे वातावरण निर्मिती सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी तातडीने नवीन कार्यकारिणीची पहिली मासिक बैठक घेतली. या बैठकीला शहरातील माजी नगरसेवक भाउसाहेब भोईर वगळता ज्येष्ठ नेते आणि आमदारांनाही अनुपस्थिती दर्शवली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीला विश्वास देण्याबाबत ज्येष्ठांनी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. मात्र, तसे चित्र दिसले नाही. किंबहूना, महापालिका निवडणूक प्रभारी आणि प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आलेले ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे दोघेही कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहीले नाहीत. माजी आमदार आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दबंग’नेते विलास लांडे सुद्धा बैठकीच्या ठिकाणी दिसले नाहीत.
“उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
विशेषत: शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांनी कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षीत होते. त्यांच्या मार्गदर्शनचा नव्या कार्यकारिणीला फायदाच झाला असता, मात्र बनसोडेसुद्धा बैठकीत दिसले नाहीत. महापालिका निवडणुकीत विजय आपलाच आहे… कामाला लागा… अशा सूचना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. मात्र, २०१७ मध्ये महापालिकेत निवडून आलेल्या ३६ नगरसेवकांपैकी कार्यकारिणी बैठकीला उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकांची संख्या अत्यल्प होती. तसेच, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनीही बैठकीला पाठ फिरवली. त्यामुळे गव्हाणेंसह शहर राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
अजित गव्हाणेंची एकाकी झुंज…
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शहरातील भाजपामधील सुमारे २५ नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत येणार, अशी चर्चा असतानाच राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे नाराजांच्या भरोस्यावर सत्ता स्थापनेची रणनिती आखणाऱ्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची कोंडी झाली. दुसरीकडे, नाराजांना हाताशी धरुन, निष्ठावंतांना बगल दिल्यामुळे राष्ट्रवादीचा कट्टर समर्थक गव्हाणेंपासून दुरावला. विशेष म्हणजे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना मानणारा गट आता सक्रीय दिसत नाही. अडीच वर्षे सत्तेत असतानाही राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले नव्हते. दोन महिन्यांपासून पवारांनी भेटी- दौरे सुरू केले. मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे राज्यात राजकारणात अजित पवार व्यस्त असताना पिंपरी-चिंचवडकडे पुन्हा दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गव्हाणेंचा कारभार हा स्वयंप्रेरित नसून, भाजपातील एक नाराज पदाधिकारी आणि योगेश बहल यांच्या सल्ल्याने चालतो. यावरुनही राष्ट्रवादीत असंतोष बळावला असून, आगामी काळात अजित गव्हाणे यांना एकाकी झुंज द्यावी लागणार, हे निर्विवाद सत्य आहे.
कल्याण डोबिंवलीतील 55 नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर; ठाकरेंना अजून एक मोठा धक्का
अजित गव्हाणेंनी संजोग वाघेरेंचे मार्गदर्शन घ्यावे…
राष्ट्रवादीच्या प्रतिकूल परिस्थितीत २०१४ पासून संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. मात्र, राज्यात सत्ता मिळाल्यानंतर राष्ट्रवादीने वाघेरेंकडून शहराध्यक्षपद काढून घेतले. पक्षाच्या संकटाच्या काळात ५ ते ६वर्षे राष्ट्रवादीचे संघटन जीवंत ठेवण्यासाठी वाघेरेंनी पुढाकार घेतला. पक्ष विरोधी बाकावर असताना अजित गव्हाणे यांनी २०१९ मध्ये भोसरी विधानसभेचे तिकटी नाकारले होते. तसेच, शहराध्यक्षपदी जबाबदारी घेण्यासही उदासीनता दाखवली होती. तेच अजित गव्हाणे पक्ष सत्तेत आल्यानंतर शहराध्यक्षपदासाठी इच्छुक झाले. मात्र, दुर्दैवाने गव्हाणे शहराध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांतच राष्ट्रवादीला पुन्हा विरोधात बसावे लागले आहे. विरोधी पक्षात असताना कशाप्रकारे संघटन वाढवावे, पक्षाची ताकद कशी काम ठेवावी आणि सत्ताधारी पक्षाकडून पक्षावर होणारे हल्ले कसे परतवून लावावे? याचे धडे आता गव्हाणे यांनी संजोग वाघेरे यांच्याकडून घ्यावेत, अन्यथा राष्ट्रवादीला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल, अशी चिंता राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांकडून व्यक्त होत आहे. तसेच, भाजपातील नाराजांच्या भरोस्यावर राष्ट्रवादीची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित गव्हाणे प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.
Read also
- “शिवसेना संपली, पुन्हा ती कधीही उठणार नाही;” नारायण राणेंचं सुचकं वक्तव्य
- ” नियतीचा खेळ! मनसेला हिणवणारे आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाला”
- “ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका घ्याव्यात;” पंकजा मुंडेंची मागणी, शिंदे सरकारची भुमिका काय?
- ‘त्या’ फाईलवर मीच सही केली होती; भुजबळांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा किस्सा
- नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; निवडणुकांच्या तारखा जाहीर