मुंबई : राज्यात अनेक सत्तानाट्यानंतर काही महिन्यांपुर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचें महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापनेपासूनच या तिन्ही पक्षांचा कोणताही निर्णय घेताना आपआपसात संवाद नसल्याची चर्चा अनेकदा समोर आली आहे. खासकरून काँग्रेस नेत्यांनी अनेकदा यावरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
ठाण्यात #कांग्रेसची पोस्टरबाजी
सरकार तिघांचं मग नाव का फक्त दोघांचं..? असे सवाल ठाणे काँग्रेसने लावलेल्या बॅनरवर विचारण्यात आलेत. तुमच्या तीन पक्षाच्या आपसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचं वाटोळं केलंत @INCMaharashtra @MumbaiNCP @ShivsenaComms pic.twitter.com/ZKwEeBfSjM— Ram Kadam (@ramkadam) August 31, 2020
निर्णय प्रक्रियेतून वारंवार डावलले जात असल्याची भावना काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पोस्टरबाजी करत सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं? असं सांगत राज्य सरकारच्या नियोजित प्रकल्पांचे श्रेय काँग्रेसलाही जाते असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर लोकांचे जनकल्याण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का? असा सवालही उपस्थित केला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष मिळून राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेसचा सातत्याने अपमान करत आहेत काँग्रेसचा स्वाभिमान शिल्लक आहे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे मात्र तीन पक्षाच्या आप आपसातिल भांडणाचा फटका महाराष्ट्राच्या जनतेला होतो आहे हे निश्चित
— Ram Kadam (@ramkadam) August 31, 2020
मात्र या तिन्ही पक्षांच्या भांडणात महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होत असल्याची टीका, भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसचा स्वाभिमान शिल्लक राहिलेला आहे की नाही ? असा खोचक सवाल देखील केला आहे.
राम कदम यांनी ट्विट केले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्ष मिळून राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेसचा सातत्याने अपमान करत आहेत. काँग्रेसचा स्वाभिमान शिल्लक आहे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. मात्र तीन पक्षाच्या आप आपआपसातील भांडणाचा फटका महाराष्ट्राच्या जनतेला होतो आहे हे निश्चित.