मुंबई : उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.राज्य सरकारकडून एका खासगी संस्थेला जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाजपाने आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
‘महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे ‘असा आरोप त्यांनी केला आहे.
‘महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे ‘, असा आरोप त्यांनी केला आहे.
Read Also :