नवी दिल्ली : राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला. विरोधकांचा गदारोळ सुरू असताना आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, ‘भारताच्या कृषी इतिहासातील आजचा दिवस एक मोठा दिवस आहे. संसदेत महत्त्वाचे विधेयकांना मंजूरी मिळल्यानंतर मी आपल्या कष्टकरी अन्नदात्यांचे अभिनंदन करतो. यामुळे फक्त कृषी क्षेत्रात परिवर्तन होणार नसून कोट्यावधी शेतकऱ्यांना शक्ती मिळेल.’
पुढे ते असे म्हणाले की, ‘आपल्या कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची तातडीने गरज आहे. कारण यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. आता विधेयके मंजूर झाल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान सहजपणे पोहोचणार आहे. यामुळे फक्त उत्पादन वाढणार नाही तर चांगले परिणाम दिसून येतील. हे स्वागत करण्यासारखे पाऊल आहे.’
Read Also :