मुंबई : राज्यात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सुरूंग लावण्याचे काम केले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे गटालाच धक्का दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण एका वेगळ्याच मार्गावर चालेलं आहे. तसेच राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण घडताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिक या सर्व घटनांना वैतागून गेली आहे.
“आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो”; शिंदे गटात उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे गटातील नगरसेवकांच्या भाजपमध्ये जाण्याने शिंदे गटाला धक्का बसला आहे. भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये नवी मुंबई मधील नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी हाकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात नियुक्त्या करून मोठ्या जबाबदा-या देताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटातील 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शिंदे गटातील होणारी फुट एकनात शिंदे कशा प्रकारे रोखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हाकालपट्टी केलेल्या नेत्यांना विविध पदांची लॉटरी ; शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. पक्षाविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेतुन रामदास कदम आणि आनंदराव अडसुळ यांची पक्षातुन हाकालपट्टी केली आहे. कालपर्यत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले पुणे जिल्हयातील मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यानी ही शिंदे गटाची वाट धरली आहे. शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील ही शिवसेनेतुन बाहेर पडले आहेत.
व्हायरल व्हिडीओ नंतर श्रीकांत देशमुखांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल
शिवसेनेच्या 14 खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या ऑनलाईन बैटकीला हजेरी लावली असल्याचं समजतं आहे. या बैठकीनंतर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासह अडसूळ यांची देखील पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर हाकालपट्टी करण्यात आली. त्यामुळेच आता शिंदे गटात हाकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांना उपनेते पदांची खैरात करण्यात आली आहे.
Read also
- “शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
- “बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
- “मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”
- आधी रड रड रडले, नंतर दिला थेट इशारा; “आमच्यामुळे खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये”
- “पुर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत”