मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या मोर्चानंतर आज देशाने पहिल्यांदा असा विराट मोर्चा पाहिला असेल. तसेच नुसता पाहिला नाही तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या छातावर बसून लोकांनी मोर्चात आगेकुच केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. तो मोर्चा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी होता. आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव, निपाणी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याचसाठी हा मोर्चा होता. असं राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामोर्चात हल्लाबोल केला.
राज्यातील अनेक झेंडे आज एकवटले आहेत. परंतु जे महाराष्ट्र द्रोही आहेत. ते आले नाहीत. तसेच बाळासाहेबांचे जे विचार घेऊन जाणारे म्हणाणारे तोतये आहेत. त्यांचे विचार दिल्लीसाठी, खुर्चीसाठी होते. त्यासाठी आमची खुर्ची गेली तरी बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. असा एल्गार देखील ठाकरेंनी पुकारला.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जर शाळा काढल्या नसत्या तर आपण देखील मंत्री बनून यांच्यासारखे शाब्दिक भीक म्हणून बसलो असतो. असं म्हणत ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांचा देखील यावेळी समाचार घेतला. हे लंपगे असून महाराष्ट्र लुटाण्यासाठी आले आहेत. या लंफग्यांना महाराष्ट्रांच्या आदर्शांनाबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी बंडखोर आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला.
महापुरुषांचा अपमानाबाबत आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाची हाक दिली आहे. त्या मोर्चात अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दोन दिवसानंतर राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे. या हिवाळी अधिवेशनात आम्ही हा आवाज उठवणार आहे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी आमची तयारी आहे. असंही अजित पवार म्हणाले.