मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला.
भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार आहे. सोलर उत्पादनांवर आयात शुल्कात वाढ, कापूस आणि रेशीम उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. देशात 100 सैनिक स्कूल स्थापन करण्यात येणार आहेत. विमा कायदा आणि बँक कायद्यांमध्ये बदल केला जाणार आहेत. डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आल्यानं पेट्रोल लवकरच शंभरी पार करु शकते. असे अनेक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले.
मात्र महाविकासाआघाडीती मधील नेत्यांना हा अर्थसंकल्प फार रुचला नसल्याचे दिसून येत आहे. अनेक नेत्यांनी या अर्थसंकल्पातीक उणीधुणी काढत मोदी सरकारच्या या तिसऱ्या अर्थसंकल्पावरवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील अर्थसंकल्पावर आपले मत मांडले.
आगामी निवडणुकांचा हा जाहीरनामा असल्याची टीका महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांचा हा जाहीरनामा असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रानं देश विकायला काढला, असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. महाराष्ट्रावर केंद्राची वक्रदृष्टी, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी दिलासा देणारी कोणतीही बाब नसल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर झाला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता. तसंच पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘मेक इन इंडिया’ टॅबचा वापर करण्यात आला.