नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासह, उत्तर प्रदेश सह 11 राज्यातील 57 विधानसभा जागांचा पोटनिवडणुकीचा आज फैसला होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सर्व नियमांचे पालक करून पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मतमोजणी केंद्रात फक्त एका व्यक्तीला हजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच मध्य प्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं पोटनिवडणूक होत आहे.
एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली होती तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. एकाच वेळी 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे समर्थक 22 आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 विधानसभा जागा आहे, यात भाजपकडे 107, काँग्रेसकडे 87, बसपा दोन, सपा 1 आणि 4 अपक्ष आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दमोह येथून काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले. मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 115 बहुमताचा आकडा गाठणे गरजेचं आहे. भाजपला आणखी 8 जागांची गरज आहे. तर काँग्रेसला 28 जागा जिंकाव्या लागणार आहे.
Read Also