सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याखाली असलेल्या अफजल खानच्या कबरीवरून सध्या राजकारण सुरू आहे. पोलिसांनी प्रतापगडाच्या पायथ्याखाली असलेल्या अनधिकृत बांधकाम पोलिसांनी रातोरात हटवले. त्यानंतर आता राज्यातून अफजल खान, आणि औरंगजेब यांच्या कबरी काढून टाकाव्यात अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“येळकोट येळकोट जय मल्हार..!” अन् आदित्य ठाकरेंनी उचलली तलवार
आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. 2017 साली कोर्टानं या अफजल खानच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती. 2017 मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती. परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अचडणी आल्या. आता या सर्व अडचणी दुर झाल्या असून सातत्याने शिवप्रेमींची मागणी होती, की त्याठिकाणचं बांधकाम तोडावं. शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले. परंतु अतिक्रमण हटवलं नव्हतं. आज सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे, कारण त्याठिकाणचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आले आहे. असंही ते म्हणाले.
“गद्दार अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून अजूनही हकालपट्टी का नाही?” राष्ट्रवादीचा सवाल
लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत जर वेेळ मागत असेल तर त्यांची भेट अवश्य घेणार. परंतु राजकारणातली कटुता संपली पाहिजे. एका पक्षाने ठरवून ती संपणार नाही. सर्वांनीच ती संपवली पाहिजे. पण सोबतच नेत्यांनी शांत राहायचं आणि कुणाला तरी बोलायला सांगायचं, ही प्रथा पण बंद झाली पाहिजे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read also
- “केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “मोदींनी राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं..”; राजू शेट्टींचा खोचक टोला
- औरंगजेब, अफजलखानाच्या कबरी सरकारने तात्काळ काढून टाकाव्या अन्यथा..;” हिंदू महासभेचा इशारा