मुंबई : काल दिलेल्या न्यायालयाच्या निकालाने आता जगजाहीर झालं आहे की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. सरकार त्यांना ज्याच्या अंगावर जा म्हणाले त्याच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणे जात आहेत आणि हे सर्व जग बघत आहेत. असं म्हणत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिकास्त्र केली आहे.
“गद्दार अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून अजूनही हकालपट्टी का नाही?” राष्ट्रवादीचा सवाल
मागील 8 ते 15 दिवसांमधील केंद्रीय कायदामंत्री रिजूजू यांची वक्तव्य आता केंद्र सरकार न्याय देवतेलाही आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे की, काय असं दाखवणारी आहेत. त्यांनी न्यायवृदांवरच शंका उपस्थित केली आहे. एकणुच सर्वसामान्यांच्या आशेचं किरण न्यायालय असते. केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असले तर देशातील तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे. अशी टिका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“अटकेचे आदेश दिल्लीहून, मला अटक करून तुम्ही मोठी चुक केली..!” संजय राऊतांचा इशारा
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी जामीन मंजुर झाल्यानंतर आज संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांचं कौतुक केलं आहे. संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंदानंतर दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. या आनंदाबरोबर संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत. ते माझे जीवलग मित्रही आहेत. असं म्हणत मित्र तोच असतो जो संकटाच्या काळआत न डगमगता लढत असतो. असंही ठाकरे म्हणाले.
Read also
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “मोदींनी राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं..”; राजू शेट्टींचा खोचक टोला
- औरंगजेब, अफजलखानाच्या कबरी सरकारने तात्काळ काढून टाकाव्या अन्यथा..;” हिंदू महासभेचा इशारा
- “येळकोट येळकोट जय मल्हार..!” अन् आदित्य ठाकरेंनी उचलली तलवार