मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्प्यातील मतदान पुर्ण झाले आहेत. यातच आता महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जागा जिंकण्याच्या संदर्भात अनेक दावे केले जात आहेत. अशातच कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकेल. असा दावा केला होता. त्यावर आता अजित पवार गटातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चव्हाणांना जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्यातील राजकारणाचा गाढा अभ्यास आहे. महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी इतकी चार वर्षे सगळ्यांनी पाहिली आहे. जोपर्यंत सुर्य चंद्र असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. अशी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची इच्छा आहे. असा टोला तटकरे यांनी चव्हाणांना लगावला. तसेच त्यांचा अंदाज आता खरा की खोटा हे येणाऱ्या चार जुनला कळेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले. यातच मागच्या निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. त्यावरून अजित पवार गटातील काही नेते बारणेंच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर ते सर्व आरोप तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”