मुंबई ; नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. या जागेवर शिवसेना शिंदे गटासह भाजप आणि राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला होता. मात्र अखेरच्या क्षणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं भाष्य करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच”, बच्चू कडूंचा संताप
लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छूक नव्हतो. मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनीच उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितले. त्यानंतर उमेदवारी घोषीत होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. खरे तर शाह यांच्या निर्णयाला विरोध करण्याचे कारण नव्हते. मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यास विरोध केला असावा. असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
हेही वाचा..पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निरिक्षक निलंबित, पोलिस आयुक्तांची धडक कारवाई
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषीत झाली नाही, अन्यथा जिंकण्याची रणनीती तयार होती. असेही भुजबळांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा..“सध्या उत्तराधिकारीबाबत भाजप पक्षांतर्गत भांडण सुरू”, आता उरले फक्त योगीजी”