मुंबई : शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन किर्तीकर यांचं एक विधान चर्चेत आलं होतं. रवींद्र वायरकर हरले काय किंवा जिंकले काय याचा मला फरक पडत नाही, परंतु याठिकाणी अमोल किर्तीकर निवडून आले तर त्याचा मला नक्कीच आनंद होईल. असं विधान केल्यानंतर गजानन किर्तीकर यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर गजानन किर्तीकर यांच्यामधला खरा शिवसैनिक जागा होत आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील माजी मंत्री अनिल परब यांनी दिलीय.
अनिल परब म्हणाले की, गजानन किर्तीकर यांच्यातला हळूहळू शिवसैनिक जागा होत आहे. जी खरी शिवसेना त्यांच्या रक्तात गेले कित्येक वर्ष भिनली होती. ती आता बाहेर येऊ लागली आहे. काही कारणास्तव त्यांची समजा भेसळ झाली होती. परंतु आता ते ओरिजन शिवसेनेबाबत त्यांच्या मनात कदाचित जागी झालीय.
अशातच उद्धव ठाकरे यांचे विचार त्यांना आता पटायला लागले आहेत. त्यामुळे हे फक्त गजानन किर्तीकर यांच्याबाबत घडणार नाही, तर हळूहळू सगळ्यांच्याच बाबतीत घडणार आहे. कारण मुळ शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या विचारांवर चालत आहे. तिकडे दुसऱ्या बाजूले जे गेले आहेत. त्यांच्या मनात देखील असचं घडणार आहे. असाही दावा अनिल परब यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा..“सध्या उत्तराधिकारीबाबत भाजप पक्षांतर्गत भांडण सुरू”, आता उरले फक्त योगीजी”
हेही वाचा…“घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच”, बच्चू कडूंचा संताप
हेही वाचा..पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निरिक्षक निलंबित, पोलिस आयुक्तांची धडक कारवाई