पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरून आता जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. त्याआधी खासदार सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता. यातच घटना घडून गेल्यानंतर काही दिवसाने पालकमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”
पुणे अपघातावरून काही दिवस उलटले असले तरी अजित पवारांनी प्रतिक्रिया येत नव्हती. त्यावरून पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर पुण्यातील कल्याणीनगर येथील घटना घडल्यानंतरच्या दिवसापासून त्याकडे माझं लक्ष होतं. कारण नसतांना या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे सांगितलं जात आहे. अशा प्रकारे गैरसमज समजामध्ये पसरवलं जात आहे. असेही अजित पवार म्हणाले.
तसेच सकाळपासून मंत्रालयात काम करत असतो. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यात कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता कारवाई केली गेली पाहिजे. तसेच जो कुणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. या मताचा मी देखील असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत ? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. त्यावर आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे. यातच या घटनेबाबत बोलत असताना आरोपीला आधी बेल द्यायला नव्हती पाहिजे, परंतु ती देण्यात आली. त्यानंतर त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला. त्याच्या वडिलाला अटक करण्यात आली. यातच या प्रकरणाची तीव्रता कमी झाली की त्याला वेगवेगळे फाटे फुटतात. तसं होऊ न देता ताबोडतोब त्यावर कारवाई झाली पाहिजे. असेही अजित पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा..विशाल अग्रवालला कोर्टाचा मोठा दणका, कोर्टात आज नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर