छत्रपती संभाजीनगर : संपुर्ण राज्यात सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घोटभर पाण्यासाठी माणसं वणवण फिरतांना दिसत आहे. यातच अचारसहिंता असल्याने सरकारला काहीही करता येत नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी पाणी टंचाईबाबत मोठं भाष्य केलंय..
आता आपण मे महिन्याच्या अखेरीस आहोत आणि साधारण जुलै एंडपर्यंत पाण्याची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या ठिकठिकाणी निर्माण झाली आहे. संभाजीनगर विभागात १५६१ गावांमध्ये पाण्याची मागणी आहे आणि या विभागात १८३७ इतके टँकर सध्या आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर तेथील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथं आवश्यकता आहेत तिथे टँकर सुरू करावेत. असे शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“पाच वर्षात एकही काम नाही, राणांचा पराभव निश्चित”, अनंत अडसुळांचा मोठा दावा
शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, मात्र विमा कंपन्या हे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून या विमा कंपन्यांना योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे. तसेच वीज बिलात सूट द्यावी. वीज बील वसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही स्थितीत बिल भरले नाही म्हणून शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये. अशी मागणी देखील पवारांनी राज्य सरकारकडे केलीय.
यासह मनरेगाच्या कामात जे निकष आहेत ते शिथिल करावेत आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजनेचे जे निकष राज्य सरकारने आणले होते त्याची अंमलबजावणी करावी. जिथं जास्त दुष्काळ आहे, पिकं गेली आहेत, त्या भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे. फळबागांचं नुकसान झाल्यानंतर अनुदान देण्याची पद्धत होती. ते अनुदान राज्य सरकारने आता देण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी पाणीप्रश्न गंभीर आहे, तिथं जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. असेही शरद पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”
हेही वाचा…“पोलिस कर्मचाऱ्याचा पबमधला फोटो ट्विट करत धंगेकरांचा पोलिसांवर निशाणा,” कारवाई करा अन्यथा…
हेही वाचा…गावाच्या पारावर राजकारणासाठी गेला जीव, कोण जिंकणार ? वाद झाला अन्…