रामटेक : राज्यातील पाच टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पुर्ण झालं आहे. याचा निकाल आता येत्या ०४ जून रोजी लागणार आहे. मात्र त्याआधी कोण जिंकणार अशा पैजा लावल्या जात आहेत. अशातच रामटेक लोकसभा मतदारसंघात गावातल्या कट्टयावर कोण जिंकणार ? यावर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेचं रूपांतर हाणामारीत झालं अन् त्यात एका जीव घेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
त्याचं झालं असं की, नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावातील पारावर बसलेल्या तरूणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणुक कोण जिंकणार ? यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला आणि त्याचे पुनर्वसन जोरदार हाणामारीत झाले. या मारहाणीत जबर मार लागल्याने सतीश फुले या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण बोरडे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालावरून झालेल्या या हत्येने परिसर हादरून गेला आहे.
दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राजभाऊ पारवे तर महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान झालं आहे. तर प्रचारासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पाच वर्षात एकही काम नाही, राणांचा पराभव निश्चित”, अनंत अडसुळांचा मोठा दावा
हेही वाचा..जनतेला दुष्काळाचे चटके, मात्र ‘या’ ५ पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही ?
हेही वाचा…“५० हजार कोटींचा गेल प्रकल्पही गेला,” अंबादास दानवेंचा केंद्रावर हल्लाबोल
हेही वाचा…“फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,” बिल्डपुत्राचा माज, अपघातानंतर रॅपमधून केली शिवीगाळ