छत्रपती संभाजीनगर : सध्या संपुर्ण मराठवाड्यात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ठिकठिकाणी लोक टोह फोडत आहेत. याच दुष्काळावर मात करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय पोलीस आयुक्तालयात एक बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी सर्व पालकमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र मराठवाड्यातील ८ पैकी ५ पालकमंत्र्यांनी दांडी मारल्याने यांना दुष्काळाची चिंता नाही का ? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”
गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून रात्री मराठवाड्यातील पालकमंत्र्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र आठ पैकी ५ पालकमंत्र्यांनी या बैठकीला दांडी मारली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील पालकमंत्री संदीपान भूमरे, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि परभणीचे पालकमं६ी संजय बनसोडे यांनी गैरहजेरी लावली. त्यावर आता टिकेची झोड उठवली जात आहे.
हेही वाचा..“पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करा,” धंगेकरांनी काही बाबी समोर आणत केली मोठी मागणी
दरम्यान, या बैठकीला तानाजी सावंत, आणि गिरीश महाजन उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत पाणी टंचाईचा आढावा घेतला. यावर काय उपाययोजना कराव्यात ? याबाबत मार्गदर्शनही केले. त्यावर पालकमंत्री गैरहजर राहिल्याने त्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“५० हजार कोटींचा गेल प्रकल्पही गेला,” अंबादास दानवेंचा केंद्रावर हल्लाबोल
हेही वाचा…“फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,” बिल्डपुत्राचा माज, अपघातानंतर रॅपमधून केली शिवीगाळ
हेही वाचा…पुणे अपघातावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढणार ?